जाधव आडनावाचा इतिहास काय आहे?
महाराष्ट्रात आठव्या शतकापासून यादवांचे राज्य होते. हे यादव श्रीकृष्णाचा भाऊ बलराम यांचे वंशज होते. बलरामाच्या वंशातील दृढप्रहार हा या वंशाचा मूळ पुरुष होता. या वंशातील सेऊणचंद्र यादवाने महाराष्ट्रात साम्राज्य स्थापन केले.त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये बलराम या व्यक्तिमत्त्वाला खूप मोठे आदरस्थान होते. बलरामाची प्रतिमा ही नेहमी खांद्यावर नांगर घेतलेली दाखवली जाते - यावरूनच समजून येते की भारतातील शेतकऱ्यांमध्ये बलरामाला दैवताचे स्थान होते. उत्तर भारतामध्ये शेतकर्यांमध्ये बलराम हे नाव प्रचलित आहे. उदाहरणार्थ बलराम जाखड हे शेतकरी कुटुंबातील होते. एकेकाळी केंद्रीय कृषिमंत्री होते. महाराष्ट्रात हेच नाव 'बळीराम' असे ठेवले जात असे. बलरामाला शेतकरी कुटुंबांत आदराने बळीराजा असे म्हटले जात असे. साधारण दोनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सरकारच्या काही चाकरांनी - ब्रिटिशांच्या फायद्यासाठी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी राक्षस राजा बलि हाच शेतकऱ्यांचा बळीराजा असल्याचे लिहायला आणि सांगायला सुरुवात केली. सरकारच्या पाठिंब्यामुळे हा ...