पुणे शहराचा नेमका इतिहास काय आहे आणि मूळचे पुणेकर कोण आहेत?
इ.स. 858 आणि 868. ताम्रपत्र द्वारे दर्शविले येते की 9व्या शतकात पुन्नका नावाची शेती वस्ती आधुनिक पुण्याच्या ठिकाणी अस्तित्त्वात होती. या प्रदेशांवर राष्ट्रकूट घराण्याचे शासन होते असे या पाट्या सूचित करतात. याच काळात पातालेश्वर रॉक-कट मंदिर परिसर बांधला गेला. 9व्या शतकापासून ते 1327 या काळात पुणे हे देवगिरीच्या सौना यादव यांनी राज्य केले.
1599 मध्ये निजामशाही (अहमदनगर सल्तनत) यांच्या सेवेसाठी मालोजी भोसले यांना देण्यात आलेल्या जागीरचा एक भाग होता. 17 व्या शतकात मुघलांच्या ताब्यात येईपर्यंत पुण्यावर अहमदनगर सल्तनतचे राज्य होते. मालोजी भोसले यांचे नातू, शिवाजी, मराठा साम्राज्याचे संस्थापक, यांचा जन्म पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या शिवनेरी येथे झाला. 1660 ते 1705 या काळात मुघल आणि मराठे यांच्यात पुण्याचे अनेक वेळा हात बदलले.
1630 मध्ये आदिल शाही घराण्याच्या छाप्यात आणि नंतर 1636 ते 1647 या काळात झालेल्या शहराचा नाश झाल्यानंतर, धडफळेचा उत्तराधिकारी, दादोजी कोंडदेव यांनी या शहराच्या पुनर्बांधणीचे काम केले. त्यांनी पुणे आणि शेजारच्या मावळ क्षेत्राच्या भागातील महसूल संकलन आणि प्रशासकीय व्यवस्था स्थिर केली. त्यांनी वाद व्यवस्थापित करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी प्रभावी पद्धती देखील विकसित केल्या. लाल महाल 1631 मध्ये कार्यान्वित झाले आणि 1640 मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले. शिवाजीने आपली तरुण वर्षे लाल महाल येथे घालविली. त्यांची आई, जिजाबाई यांनी कसबा गणपती मंदिराच्या इमारतीचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते. या मंदिरात अभिषेक केलेली गणेशमूर्ती शहराचे प्रतिष्ठित देवता (ग्रामदेवता) म्हणून गणली जाते.
1703 ते 1705 पर्यंत, 27 वर्षांच्या मुघल-मराठा युद्धाच्या शेवटी, या शहरावर औरंगजेबचा ताबा आणि त्याचे नाव बदलून मुहियाबाद करण्यात आले. दोन वर्षांनंतर मराठ्यांनी सिंहगड किल्ला आणि नंतरचा पुणे पुन्हा मोगलांपासून ताब्यात घेतला.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पुणे (१,००,०००-१४००)
- पुणे शहरात १ लाख वर्षांपूर्वी पुराष्मयुगीन मानवी वस्ती होती. हे पुण्यातील 'बंडगार्डन' या भागात काही प्राचीन दगडी हत्यारे सापडल्यानंतर, त्यांचा काळ कळल्यानंतर सिद्ध झाले.
- पुण्यात पांडवनगर परिसरात इ.स. पूर्व २ऱ्या शतकातील बौद्धलेणी सापडली आहेत.
- इंदापूर जवळील कझाद या गावाजवळ काही नाणी सापडली आहेत त्यावरून हे स्पष्ट होते की इ.स. ४६५ मध्ये त्रैकुटक राजांचे पुण्यावर राज्य होते.
- त्रैकूटक नंतर राष्ट्रकूट वंशाच्या कृष्ण राजाने १६ ऑक्टोबरइ.स. ७५८ मध्ये कैलास लेणे खोदले, त्याच्या एका ताम्रपटात पुण्याचा सर्वप्रथम उल्लेख 'पुण्यविषय' असा आला आहे.
- इ.स. ९९३ मध्ये शिलाहार राज्यांच्या राजवटी मधला एक ताम्रपट मिळाला आहे त्यात पुणे आणि खेड(राजगुरूनगर) चा उल्लेख अनुक्रमे खेटक आणि पुणक असा आला आहे.
- पुणे काही काळ यादवांच्या अंमलाखाली होते.
- १४व्या शतकाच्या पूर्वार्धात पुण्यावर मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला.
बाकी १७व्या शतकपासूनचा म्हणजेच शहाजीराजे, शिवाजी महाराजांच्या पासूनचा इतिहास सर्वांना माहीत असेल असं गृहीत धरतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पुणे हे नाव कसे पडले? त्यामागचा काय इतिहास आहे?
आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.माझ्या माहिती प्रमाणे तर इतकीच माहिती देऊ शकतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पुण्यातील स्वारगेटला 'स्वारगेट' हे नाव कसे पडले?
जुन्या काळी शिवाजी महाराजांच्याकाळात मुळा नदीच्या किनारी पुनवडी नावाचे गाव होते.महाराजणी कसबा पेठेव जवळ लाल महाल बांधला." "तिथे वस्ती वाढू लागली.पण स्वराज्यावर आक्रमणे होऊ लागली.जशी वस्ती वाढत होती तसेच चौक्या किंवा नाक्यावमचे ठिकाण बसत होते. ही महत्वपूर्ण ठिकाणं इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली. इंग्रज काळातील कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव 'गेट' असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे "स्वारगेट" असे ओळखले जाऊ लागले. आजतागायत ते नाव तसेच राहिले आहे.(पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते)
सातारा ही राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी बसवलेली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी, जकात वसूल आणि इतर सामाजिक सुरक्षितेसाठी करण्यासाठी सुद्धा होत असे. स्वारगेट सोडून कोंढवा गेट क्वार्टर गेट जाईचे गेट पूल गेट पेरू गेट फडगेट मरीआई गेट म्हसोबा गेट, रामोशीगेट, पुलगेट ही गेट आजही पुण्यात अस्तित्वात आहेत. पैकी रामोशीगेट येथे चौक्यांवर पहारेकरी म्हणून रामोशी समाजातील लोकांची नेमणूक केली जायची. त्यावरून तिथल्या जागेला 'रामोशीगेट' असे नाव मिळाले.स्वारांचा पहारा or गेट या जागेवर पूर्वी होते त्यामुळे नाव ''स्वारगेट'' पडले,
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पुण्याला मिळालेल्या वाकाटक राणी प्रभावती गुप्तच्या शिलालेखावरून ह्या प्रदेशास पूर्वी पुण्यविषय असे नाव होते .
पूढे यादव काळात याचा अपभ्रंश पुनविषय असा झाला व नंतर बहमनी काळातील काही लेखांवरून कळते त्या काळी पुनवडी हे नाव प्रचलित असावे ज्याचे नंतर पुणे झाले .
पुण्याचा इतिहासकालीन भूभाग म्हणजे आजचे कसबा पुणे.यापरिसरात नदीचे काठी एक शिवालय आहे(याचा शोध/पुनर्शोध इतिहाससंशोधक पांडुरंग बलकवडे यानी लावला आहे. त्या शिवालयाचे नाव पुण्येश्वर.
भारतातील बरीच मंदिरे ज्यात इश्वर हा शब्द आहे त्या सर्व ठिकाणी बोली भाषेत सर असा झाला आहे.उदा.अमृतेश्वर चे अमृतसर.बालेश्वर चे बालेसर(बालासोर).चितळेश्वरचे चितळसर.तसेच पुण्येश्वर चे पुणेसर.पुणेसर पासून पुणे.
अविनाश सोवनी यांनी हरवलेले पुणे या पुस्तकात मध्येखालील ओळी लिहले आहे
विसाव्या शतकात तळ्यातल्या गणपतीची सारसबाग झाली. उंबऱ्या गणपती चौकाचा शगून चौक झाला. सोट्या म्हसोबा, गुरुजी तालमीचा गणपती वगैरे काही देवस्थानांनी रस्तारुंदीसाठी स्थानांतर केले. बंडगार्डनचा बराचसा भाग रस्तारुंदीत गेला आणि पानशेतच्या पुरानेही बागेला रया आली. तुळशीबाग देवस्थानचे रूप असे पालटले की चिं. वि. जोशींनी विनोदाने लिहिले, 'पुण्यात खास बायकांसाठी बांधलेला तुळशीबाग नावाचा बाजार असून त्यात श्रीरामाचे देऊळही आहे.'[1]
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी वेगवेगळ्या पेठांमुळेच जुन्या पुण्याची ओळख होती.. त्यापैकी काही प्रसिद्ध आहेत, तर काही पेठांना आजही प्रसिद्धी मिळालेली नाही.पण या पेठांमुळे बरेचसे पुणेरीपण टिकविले आहे. काळानुरुप बदल झाले असतील पण ते पुणे आता राहिलेच नाही म्हणणाऱ्यांनी इथे चक्कर मारलीच पाहिजे.
आठवड्यांच्या वारांनुसार किंवा या पेठा ज्यांनी वसवल्या आहेत त्यांची नावं या पेठांना देण्यात आल्या आहेत.
काही पेठांना इतिहासकालीन नावे देण्यात आली आहेत. शहाजीराजे भोसले यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली तेव्हा रंगो धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या.
कालांतराने दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली.
- कसबा पेठ
शिवाजी महाराज पुण्यात येईपर्यंत पुणे शहर (पुनवडू) हे कसबा पेठेपर्यंत मर्यादित होतं. त्याकाळी या कसबा पेठेची पूर्णतः दुर्दशा झाली होती. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांकरवी कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. कसब्यातील लाल महालात शिवाजी महारांजे बालपण गेले, त्यामुळे हा महाल आता जगभरासाठी प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखला जातो. पुण्याचं ग्रामदैवत असलेलं कसबा गणपती मंदिर, कुंभारवाडा, गावकोस मारुती मंदिर, तांबट आळी, त्र्यंबकेश्वर मंदिर, पुण्येश्वर मारुती मंदिर, शिंपी आळी, साततोटी हौद आदी प्रेक्षणीय स्थळं या पेठेत पाहायला मिळतात.कसबा पेठ ही पुण्यातील सगळयात जुनी पेठ आहे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती याच ठिकाणी आहे. छत्रपतींचे वडील शहाजी महाराज यांनी कसबा पेथ्त पुण्याच्या दक्षिणेस भव्य लाल महाल बांधला. शुक्रवार पेठ : जिवाजीपंत अण्णा खासगीवाले कोतवाल यांनी ही पेठ तिसरे पेशवे श्रीमंत बाळाजी बाजीराव यांच्या आदेशा वरुन वसविली होती. क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार हे पेठ इतर सर्व पेठांपेक्षा मोठी होती.
- गुरुवार पेठ
गुरुवार पेठेला वेताळ पेठ असंही म्हणतात. १७३० साली जिवाजीपंत खासगिवळे यांनी ही पेठ विकसीत केली. या ठिकाणी कधीकाळी हत्तींची झुंज लावली जायची.
- नवापुरा पेठ
जीवन घनशाम यांनी १७८८ साली पेशवे सरकारांकडे एक पेठ वसवण्याची परवानगी मागितली. परंतु, परवानगी मिळूनही ही पेठ वसू शकली नाही. त्यानंतर काही वर्षांनी माधवराव रामचंद्र यांनी ती पेठ वसवण्याची जबाबाबदारी स्वीकारली. दुर्दैवाने त्यांनाही या बाबतीत यश मिळाले नाही, आणि पुण्यातील नवापुरा नामक पेठ वसता वसता वसायची राहून गेली. कालांतराने इथे लोक वाढत गेली आणि नवापुरा पेठ बसत गेली. भवानी पेठेच्या पूर्वेला ही पेठ आहे.
- नागेश पेठ
१९६५ ते ७० च्या काळात या पेठेला न्याहाल पेठ असं नाव होतं. . पुणे पालिकेने या पेठेचं नाव अधिकृतरित्या नागेश पेठ केलं. १९५० सालीच हे या पेठेचं नामांतरण करण्यात आलं होतं. मात्र ६० ते ७० पर्यंत या पेठेला न्याहाल पेठ म्हणूनच ओळखलं जाई.
- नाना पेठ
सध्या ज्या ठिकाणी घरगुती सामानांचा बाजार भरला जातो तोच नाना पेठ. नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर या पेठेला नाना पेठ असं नाव देण्यात आलं. त्याआधी या पेठेला निहाल पेठ असं म्हटलं जाई.
- नारायण पेठ
नारायणराव पेशवांच्या राजवटीत ही पेठ वसवण्यात आली. तो काळ होता १७७३ सालचा. सुप्रसिद्ध असा केसरी वाडा म्हणजेच गायकवाड वाडा या नारायण पेठेतच आहे.इ.स. 1772 पर्यंत असलेल्या 9 पेठांमध्ये ही पेठ अस्तित्वात नव्हती. मराठा साम्राज्याच्या या पाचव्या पेशव्याने माती गणपती ते लकडी पूल म्हणजे आताच संभाजी पूल या भागावर वस्तीस लोकांना मदत केली दिले. त्या नवीन नारायण पेठेची वस्ती मुठा नदीच्या बाजूने झाली. इ.स.1773 अखेरीस या भागाची भरभराट झाली आणि पुण्याच्या पश्चिमेस महत्त्व प्राप्त झाले. हा भाग नारायणराव पेशवे यांनी वसविला म्हणून त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर या पेठेला ‘नारायण पेठ’ असे नाव दिले गेले. नारायणरावांची पुण्याच्या विकासाला हातभार लावण्याची इच्छा असावी. त्यांनी कुंभारवेस पुलाची दुरुस्तीसुद्धा करून घेतली होती.
पानशेतच्या पुरामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झालं होतं. त्यामुळे निर्वासितांना वसवण्यासाठी नवी पेठ स्थापन करण्यात आली. अलका टॉकीज चौकापासून दांडेकर पुलापर्यंतच्या लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा असलेला भाग म्हणजेच नवा पेठ.
- बुधवार पेठ
सध्या पुस्तकांच्या बाजारपेठेमुळे प्रसिद्ध असलेला बुधवार पेठ औरंगजेबच्या काळात मोहिताबाद म्हणून ओळखला जायचा. थोरले माधवराव पेशवा यांच्या काळात या मोहिदाबादेचं बुधवार पेठ असं नामांतरण झालं. या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे. तसंच बुधवार पेठेतील काही भागात वेश्याव्यवसायही चालतो.ब्रिटिशनी त्यांच्या सैन्य साठी दुसऱ्या महायुद्ध मधील कॅम्प मधीक सैन्य साठी १९४१ साली वेश्या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले.या ठिकाणी रस्त्याचे दुतर्फा कापडाचे व्यापारी कापड व्यवसाय करीत असल्याने या भागाला ‘कापड गंज (पेठ) किंवा कापड आळीअसेही म्हणत, जवळच एक विठ्ठलाचे मंदिरही होते त्याच्या समोरच नारायण गावचे काही पासोड्या विकणारे व्यापारी बसत म्हणून त्या विठ्ठलालाही ‘ पासोड्या विठोबा ‘ असे म्हटले जाऊ लागले. बुधवार पेठ औरंगजेब १७०३ मध्ये बसवली अस समजतात
- गंज पेठ
- सवाई माधवराव पेशवा यांच्या राजवटीत गंज पेठेची स्थापना झाली. या पेठेला महात्मा फुले पेठही म्हणतात. महात्मा फुलेही गंज पेठेतच राहत होते. अस्पृश्यांची पहिली शाळाही या पेठेत स्थापन झाली होती. महात्मा फुले यांच्या निधनानंतर गंज पेठेला महात्मा फुले पेठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. टिंबर मार्केट आणि भवानी मच्छी मार्केट या पेठेत प्रसिद्ध आहेत.
- सोमवार पेठ : इसवी सन १७७३ मध्ये थोरले बाजीराव पेशव्यांनी नगराच्या पूर्व सीमेवरून होणाऱ्या दळणावळणावर लक्ष ठेवणे सोयीचे जावे या कारणास्तव सुरक्षेसाठी विशेष व्यवस्थाकेळी व अनेक गस्ती नाके बांधलेच पण त्याचबरोबर जुन्या शाहूपुरा पेठेची नव्याने पुर्बांधणी करून तिचे ‘सोमवार पेठ’ असे नवीन नामकरणही केले. येथील नागेश्वर मंदिर हे आबा शेलूकर ह्यांनी बांधले आहे.
- मंगळवार पेठ : औरंगजेब बादशाहाचा मामा शाहिस्तेखान दख्खन मोहीमेवर ९ मे १६६० रोजी पुण्यामधे आला,त्यावेळी त्याने लाल महालामद्ध्ये आपला मुक्काम ठोकला , आणि त्याचेसोबत आलेल्या लाखांच्यावर सैनिकाची व्यवस्था त्याने लाल महालाच्या आजूबाजूच्या असलेल्या मोकळ्या जागेत केली.जवलूनच मुठा नदी जात असल्याने पाण्याचीही सोय झाली. तीन वर्षातच बाजारपेठ बहरली. शाहीस्तेख्नाचीया पेठ म्हणून हीला शास्तापुरा आसेही म्हणत असत अशीही कागदोपत्री नोंद आढसळते.छत्रपती शिवाजीमहाराजांनी शाहीस्तेखानाच्या छावणीवर हल्ला करून लाल महालाच्या खिडकीतून शाहीस्तेखान पळून जात असता त्याची बोटे छाटली त्यामुळे घाबरून जाऊन खान दिल्लीला पळून गेला.
- गुरुवार पेठ : छोट्या व्यापार्यांीची फारच गैरसोय होऊ लागली.जवळपासच्या छोट्या छोट्या गावातून आपला माल घेऊन येऊन विकणारे बरेच छोटे व्यापारी होते. दिवसभर व्यापार करून दिवेलागणीला परत घरी जाणारे. अशा व्यापाराला मेण बाजार असे म्हणतात. या छोट्या व्यापार्यां ना व्यवस्थित जागा मिळावी या उद्देशाने नानासाहेब पेशव्यांनी ही नवीन ‘ गुरुवार ’ पेठ वसविली ,तेथे एक वेताळाचे देऊळही बांधले त्यामुळे ‘ वेताळपेठ ’ असाही उल्लेख केलेला आढळतो .या गुरुवार पेठेत अठरापगड जातींचे व्यापारी होते.उदा. सोनार , लोहार , जंगम , काची , पेंधारी , छप्परबंद , मोची , तांबोळी इत्यादी.
- शनिवार पेठ : शनिवार पेठ जरी आधीपासूनच अस्तित्वात असली तरी शनिवार पेठेचे महत्व वाढले ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांच्या काळात च. (इ.स.१७९६ ते १८१७) त्या काळात या शनिवार पेठेला पेठेला अनन्यसाधारण महत्व येण्याचे कारण म्हणजे पेशव्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक,खास मर्जीतले अधिकारी व सरदार आणि इतर दरबारी प्रमुख व्यक्ति यांचे वास्तव्य प्रामुख्याने या पेठेतच होते हे होय.
- रविवार पेठ : कसबा पेठ आणि शनिवार पेठ येथील वस्ती वाढत होती आणि जागा अपुरी पडत होती त्यामुळे थोरले बाजीराव पेशवे यांनी पूर्वीच्या केदार वेशीच्या बाहेर जुन्या मलकापुर पेठेच्या दुतर्फा नव्या पेठेची उभारणी करून तिचे (आदित्यवार) ‘ रविवार ‘ पेठ असे नामकरण केले. जुन्या केदावेशिपासून ते पासोद्या विठोबाच्या मंदीरापर्यंतच्या रस्त्यावर व्यापार्यांेनी बाजारपेठा वसविल्या. शेजारच्या मुहियाबाद पेठेतल्या (बुधवार पेठ) कापडालीमध्ये सुद्धा दुकानांची भाऊगर्दी झाली होतीच म्हणूनच रविवार पेठ दक्षिणेकडे वाढवून सराफाञ्ची दुकाने थाटली गेली. रविवार पेठेच्या दक्षिणेकडील टोकाला सोन्या मारुती आहे. रविवार पेठ म्हणजे श्रीमंत व्यापारी पेठ अशी ओळख आहे.
- गणेश पेठ : रविवारपेठेच्या पूर्वेला आणि गंजपेठे च्या उत्तरेला वसाहत स्थापण्यात आली आणि गणेश पेठ असे नामकरण करण्यात आले. येथे असणाऱ्या डुल्या मारुतीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी, पानिपत संहाराच्या बातम्या ऐकून इथला मारुती डोलू लागला म्हणुन याला ‘डुल्या मारुती’ असे नांव पडले.
- मीठगंज पेठ : त्याकाळी या भागात मोठ्या प्रमाणावर मीठाचा व्यापार, साठवण, विक्री चालायची म्ह्णुन या भागाला ‘ मीठगंज ‘ पेठ असे नाव पडले. मिठाबरोबरच येथे मोठ्या प्रमाणावर अॅन मालाची गोदामे होती म्हणून काही काळानंतर ‘ गंज पेठ ‘ असे नामकरण करण्यात आले. त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले येथे रहात असत व आता शासनाने त्याच जागेवर आता त्यांचे स्मारक केल्याने आता या पेठेचे नांव ‘ महात्मा फुले पेठ ‘ असे बदलण्यात आले आहे.
.
- घोरपडे पेठ : सरदार मालोजीराव घोरपडे (१७८१) यांचे स्वतःचे खासगी सैन्यदल होते . त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचा नांवानेच ही पेठ वसविली गेली.
- रास्ते पेठ : पेशव्यांचे एक सरदार आनंदराव लक्ष्मण रास्ते (१७८२) हे पेशव्यांचे घोडदळ सांभाळायचे. त्यांच्याच नांवे ही पेठ ओळखली जाते.
- भवानी पेठ (टिंबर मार्केट) : नागझरीच्याही पलीकडे जेथे १६०३ मध्ये औरंगजेबाच्या सैन्याची छावणी होती , त्या जागेवर पुण्याचा विस्तार करावयाचे माधवराव पेशव्यांनी ठरवले . तेथील पेशव्यांचे कारभारी सखाराम भगवंत यांनी मोकळ्या जागेत भवानी देवीचे मंदिर बांधले. त्याउले पुढे ही ‘ भवानी पेठ ‘ म्हणूनच ओळखली जाऊ लागली.भवानी पेठेला पूर्वी बोरवन या नावाने ओळखलं जायच
पुण्याच्या या पेठांचे १८६९ ते १८७२ या दरम्यान रे लाईट या ब्रिटीश अधिकाऱ्याकडून नकाशामापन या शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार सर्वेक्षण करण्यात आले. कारण तेव्हा पेठा म्हणजेच पुणे आणि पुणे म्हणजेच पेठा होते.
- सदाशिव पेठ
पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली पेठ म्हणजे सदाशिव पेठ. या पेठेत ब्राह्मण वस्ती जास्त प्रमाणात आहे. पानिपतच्या लढाईत सादाशिवराव भाऊरावांना वीरगती प्राप्त झाली होती. त्यामुळे या पेठेला सदाशिव पेठ असं नाव देण्यात आलं. पुण्यातील असंख्य जुने वाडे येथे आजही बघायला मिळतात. सारसबाग, विश्रामबाग वाडा, भारत इतिहास संशोधन मंडळ आदी विविध स्थळं इथं पाहायला मिळतात.
- सेनादत्त पेठ(नवी पेठ)
१९६२ साली पुण्यात झालेल्या महापुरामुळे सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या भागात घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे ही सारी पेठं उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळी येथील नागरिकांचं पूनर्वसन करण्यासाठी भारतीय लष्करानं वैकुंठ स्मशानाजवळच्या मोकळ्या जागे राहण्याची सोय करून दिली. भारतीय लष्कराने ही पेठ बांधून दिल्याने या पेठेला सेनादत्त पेठ असं नाव पडलं गेलं. याच पेठेला नवी पेठ असंही म्हणतात.अलका टॉकीज चौकापासून दांडेकर पुलापर्यंतच्या लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा असलेला भाग म्हणजेच नवा पेठ.
- हणमंत पेठ
पुण्यातल्या भोर्डे आळीत मारुतीचं एक मंदिर आहे. या मारुतीला गंजीचा मारुती असंही म्हणतात. या देवळाच्या परिसाराला हणमंत पेठ म्हणून ओळखलं जां. १९१०साली ही पेठ वसवण्यात आली. पण कालांतराने ही पेठ नाना पेठेत विलीन झाली. नाना पेठेतच ही भोर्डे आळी आहे. म्हणून नानापेठेतली हणमंत पेठ असं या विभागाला म्हटलं जात.
संदर्भ
2]History of PUNE: पुण्याचा इतिहास, असे घडले पुणे.....!
3]Details Of Each Peth and their date of Establishment
4]पुण्यातल्या पेठा | Petha in Pune | Discover Maharashtra
5]https://www.discovermh.com/petha-in-pune/
तळटीपा
Comments
Post a Comment